अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 

 


महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ३१

सरळ अर्थ: रामाने  बळाचा वापर करून आणि अतिशय पराक्रमाने युद्ध करून देवांना घोर संकटातून सोडविले, त्याच रामाचे स्मरण प्रत्यक्ष शिव आणि पार्वती देखील करतात . हा असा आगळा आणि सर्व गन संपन्न श्रीराम आपल्या दासाबद्दल अभिमान बाळग तो आणि त्याची उपेक्षा कधीही करत नाही  

विश्वामित्र ऋषीच्या विनंतीवरून दशरथ राजाने रामाला आज्ञा केली की ऋषीमुनींच्या तपात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा नाश करावा. त्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या बरोबर गेले आणि त्यांनी ताटका या राक्षसप्रवृती अंगिकारलेल्या दुष्ट यक्षिणीचा वध केला, मारीच, सुबाहु इत्यादींचा बंदोबस्त करून तपोभूमी निर्विघ्न केल्या, राम-रावण युद्धानंतर रावणाने कैदेत टाकलेल्या कित्येक देवांची सुटका केली. अशा या महाप्रतापी रामाच्या आगळ्यावेगळ्या गुणांची जाण प्रत्यक्ष त्रिशुलधारी शिव आणि हिमालयकन्या पार्वती या दोघांनीही ठेवली असून ते दोघेही रामाचे म्हणजे तो ज्याचा अवतार आहे त्या विष्णूचे नित्य स्मरण करतात. रामाच्या आगळ्यावेगळ्या गुणांमध्ये आपल्या सेवकाचा, भक्ताचा सार्थ अभिमान बाळगण्याचा गुणही आहे आणि त्यामुळेच तो आपल्या सच्च्या भक्ताची, दासाची उपेक्षा कधी करत नाही.

बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की, "जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे." शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की, जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते.

साक्षात शंकर आणि पार्वतींचे उदाहरण या श्लोकात दिले आहे त्या वरून आपण भगवंतचे अनुसंधान करण्यासाठी प्रववृत्त होऊ आणि अधिक जोमाने आणि दृढ निश्चयाने नामस्मरण करू हाच समर्थांचा उद्देश आहे

 

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी