अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 



भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे। 

परी सर्वही स्वस्वरुपी साहे॥

मना भासले सर्व काही पहावे। 

परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥

 

भुते = इतर प्राणी     पिंड = आपला देह / शरीर     ब्रह्मांड = universe  स्वस्वरूपी = अंतरात्मा

 

पिंडी तेच ब्रह्मांडी असे आपण नेहेमी म्हणतो त्याचा अर्थ सांगणारा हा श्लोक. कसे ते बघूया. आपला देह अनेक अवयवांनी बनलेला आहे. प्रत्येक अववयात अनेक TISSUES आहेत. प्रत्येक टिशूमध्ये प्रचंड प्रमाणात BIOLOGICAL CELLS (सेल्स) आहेत. सेल्स या शरिराचा अत्यंत सूक्ष्म व शेवटचा भाग समजला गेला आहे. हे सेल्स साध्या डोळ्यांनी दिसणे अशक्य आहे. प्रत्येक जीवंत शरीराचे जे नैसर्गिक कार्य असते तेच कार्य हा प्रत्येक CELL करत असतो. ते कार्य म्हणजे श्वासोच्छवास (Respiration) पुर्नउत्पादन (Reproduction) आणि प्रतिक्रिया (Reaction). बाकी इतर गुणधर्म हे सारे संपूर्णपणे त्या अवयवांच्या एका छोट्याशा (Cell) सेल्स मध्येही प्रतिबींबित होतात. म्हणजे जे नैसर्गिक कार्य शरीर करते तेच कार्य ती सेल्स स्वतंत्रपणे करते. ऊर्जा मिळवणे, तयार करणे व तीचा उपयोग करणे. ब्रह्मात सुद्धा कायम तेच सुरु असते. त्याच्या मागे सुद्धा परमात्मा आहे. जो परमात्मा त्या छोट्या Cell मध्ये ऊर्जा किंवा चैतन्य निर्माण करतो. त्यालाच परमात्मा (GOD) म्हणतात.

G-GENERATION O-OPERATION D-DESTRUCTION अजून पुढे जाऊन सूक्ष्म नजरेने जर विचार केला तर प्रत्येक प्राण्यामध्ये (भुते) अशीच अनेक सेल्स असतात. आणि त्याच धरतीवर त्याच पद्धतीने प्रत्येक कार्य व त्याचा कार्यभाव हा त्या प्राण्याच्या छोट्याशा सेल्समध्ये पण होत असल्याचे प्रखरतेने जाणवते.

संपूर्ण विश्वाच्या हालचाली केवळ त्या सेल्समध्ये प्रतीत करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंता मध्येच असते. त्या वरून परमात्म्याची महानता, कल्पकता, योग्यता आणि दिव्यता किती असेल हे आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे. जे सेल्स सजीव प्राण्यांमध्ये असतात तसेच निर्जीव वस्तूंमध्ये  सूक्ष्म परमाणू (ATOM) (निर्जीव) असतात. देहाच्या सेल्सचे अर्थात सूक्ष्म घटकाचे, देहाचे, जगाचे आणि प्रचंड अशा विश्वाचे, एक विलक्षण नाते संबंध असल्याचे जाणवते.  गंभीर विचारांनी चिंतन केल्यास त्यातील सत्य लक्षात येते. सजीवामधील सूक्ष्म घटक सेल्स आणि निर्जीव पदार्थामधला सूक्ष्म घटक अणू हे होय. सेल्स अणू ऊर्जा निर्मीतीचे स्त्रोत आहेत. त्यांच्या स्थरावर सतत ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच तो परमात्मा आपल्या दिव्य शक्ती रुपाने चरा चरामध्ये सर्वत्र भरलेला आहे. आता हा प्रत्येक CELL शेवटी पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे  हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. १)पृथ्वी, २)आप (पाणी),३)तेज (उष्णता) ४) वायू, ५)आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम या पासून ब्रह्मांडाची  निर्मिती झाली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर हे सुद्धा त्यानेच बनलेले आहे. आपल्याला दिसणारे हे ब्रह्मांड म्हणजे  आकाशातील ग्रह, तारका, भूमी, झाडेयाची निर्मिती पंच महाभूतांपासून झाली आहे.  सगळे प्राणी(भुते) आणि आपण स्वतः म्हणजे – पिंड. आता हा आपला देह देखील पंचमहाभूतांच्या संयोगातून बनलेला आहे. कारण मृत्यू झाला की देह आणि आत्मा विलग होतात. आपला देहा त्यावेळेस राख, ज्वाला, बाष्प, वायु अशा स्वरूपात पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जात असतो. म्हणजेच देह, पंचमहाभूते आणि ब्रह्मांड यांच्यातले ऐक्य आहे. कोणतीही वस्तू नाश पावते त्यावेळेस त्याचे रूपांतर याच पंच महाभुतांमध्येच होते. तेच समर्थ पहिल्या ओवीत सांगत आहेत भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. परंतु ब्रह्मांड, पिंड आणि भूत यांचे ऐक्य असले आणि प्रत्येकाच्या मागे परमात्मा असला तरी तो मूळ स्वरूपात आपल्याला दिसत नाही. तो पडद्याच्या मागे असतो पण आपल्या खऱ्या स्वरूपात येत नाही.

असे असले तरी जर आत्मास्वरुपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तेथे त्रिगुण किंवा पंचमहाभूते यांचा काहीही उपयोग नाही कारण आत्माराम या पंचमहाभूतांच्या पलीकडे आहेत. ईश्वर निर्मित ही सृष्टी खरी नाही तो खरा भ्रम आहे . म्हणजेच भास आहे असे मानतात . त्यालाच माया असे म्हणतात. माया नश्वर आहे . असे हे सृष्टीचे खरे स्वरूप काय आहे हे आपल्याला कळते तेव्हा आपण या दृश्य विश्वात भावना गुंतून पडू नये हे समर्थांना या श्लोकातून सांगायचे आहे. या सृष्टीकडे पहावे आणि त्यांच्याबाबतची ममत्वाची, हव्यासाची भावना सोडून देऊन, नि:संगपणे रहावे यातच सुख आहे.

 या श्लोकातून कोणीजे दिसते आहे ते निमुटपणे पहावे आणिआपला त्याच्याशी काय संबंध? आपल्याला काय कारायचंय त्याच्याशी?’ अशी भावना ठेवून निवांतपणे आपले जीवन आपण जगत रहावे असा निष्कर्ष कोणी काढील तर ते चुकीचे आहे. कारण अशा जगण्यात निरिच्छपणा, नि:संगवृत्ती नाही तर फक्त आपल्याच  जीवनाबाबत आत्मकेंद्रित होऊन रहावे ही प्रवृत्ती आहे. आणि समर्थ अशा प्रवृत्तीचा अंगीकार करायला सांगत नाहीत. संग सोडून सुखी राहावे म्हणजे मोह, माया, लोभ, टाळून शांत, स्थिरचित्त होऊन रहावे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी