अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा

 


प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

 वरवर दिसावयास अगदी व्यावहारिक आणि तांत्रिक उपाय समर्थ सांगत आहेत. तसें म्हटले तर कोणालाहि साधाव्या, आचरणांत आणण्यास सोप्या जाव्या आणि निष्ठेने करीत राहिल्या तर अधिकाधिक भगवंताच्या निकट जाण्यासाठी हे उपाय आहेत.  सूर्योदयापूर्वीच्या - तास म्हणजे प्रभातकाळ, सामान्यतः ४॥ पासून -६॥ पर्यंतचा काळ प्रभातकाळ म्हणता येईल,  .त्या वेळेस उठून सकाळी काही काळ रामाचे स्मरण केले तर दिवसभर आपल्याला स्मरण राहायला मदत होते . हें नामस्मरण वैखरी ने (उच्चरून किंवा ओठ आणि जीभ हलवत)  करण्यासाठी समर्थ आपल्याला सांगत आहेत . वैखरीच्या वाणीच्या आधीं ज्या मध्यमा(गळ्यातून)  पश्यन्ति(ह्दयातून)  आणि परा (बेंबी पासून) अशा वाणी शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत त्याद्वारा करावें, परेच्याद्वारा नामस्मरण घडणे ही गोष्ट सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार अवघड अशी आहे आणि ती फक्त संतांना जमते आणि म्हणूनच समर्थ सुरुवातीला वैखरीने नाम घ्यावे असे सांगत आहेत . याचा अर्थ असा नाही की एकदा सकाळी नाम घेतल्यावर आपला आणि नामाचा संबंध संपला . प्रत्येक नवीन गोष्ट सुरु करणे म्हणजे त्या कार्याची "प्रभात" असे म्हणता येईल .त्या नुसार प्रत्येक कृतीच्या सुरुवातीला रामाचे स्मरण करीत राहावे . वैखरीने नाम घेतल्याने विसरायला होत नाही म्हणून समर्थ वैखरीने घेण्यासाठी सांगत आहेत . आपल्या अल्प बुद्धिला असे वाटते नामस्मरणांत घालविलेली १०-१५ मिनिटें काही उपयोग होणार आहे का ? उगीचच असे नाम घेऊन त्याचा काय उपयोग ? असे श्री राम जय राम म्हणून काय देव भेटणार आहे का ? अशी शंका मनात येणार. पण ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास , गोंदवलेकर महाराज यांच्यासारखे थोर थोर महात्मे, विचारवंत पुरुष सांगतात त्या अर्थी काहीतरी त्याचा फायदा असणार अशी धारणा ठेवावी .  यासाठी आपले कर्तव्य करून उरलेला वेळ आणि काम करत असतांना सुद्धा नामस्मरणाने केले तर नुकसान काहीच होणार नाही , झाला तर लाभच होईल

पहिल्या दोन ओळींत नामस्मरण करावे असे सांगितल्यानंतर पुढच्या तिसर्या ओळींत समर्थ सद्वर्तनी असावे, सदाचाराचा त्याग करू नये असे सांगत आहेत. सदाचार हाच थोर आहे. म्हणजे श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय स्वीकार्य आहे. तो आचरणांत आणलाच पाहिजे. त्याचा त्याग होता कामा नये. आता हा सदाचार म्हणजे तरी काय ?संतांना आवडेल असे वागणे म्हणजे सदाचार . प्रत्येक कृती करण्या आधी भगवंताला हे वागणे आवडेल का असा विचार करून आपण वागावे . इतका तारतम्य भाव आपल्यात मुळात असतो . समोर भगवंत असेल तर आपण असे बोलू का , असे वागू का , असा विचार करू का असे आपण मनात आणले आणि वागले म्हणजेच सदाचार . सगळ्या मनाच्या श्लोकात सदाचार म्हणजे काय हे वेळो वेळी अत्यंत विस्तृत स्वरूपात सांगितले आहे . त्यातील काही श्लोक इथे उल्लेख केले आहेत 

1) धर्माने वागावे असे समर्थ श्लोक क्रमांक मध्ये सांगत आहेत . मना धर्मता नीति सोडू नको हो मना अंतरी सार वीचार राहो

2) धैर्याने वागावे आणि घाबरून जाऊ नये असावे.असे सातव्या श्लोकात समर्थ म्हणतात, ’मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवीं धरावे

3) सत्य बोलावे. सत्य बोलणे हा सदाचारातला महत्वाचा गुण. ‘सत्यमेव जयतेहे वचन माहिती आहेच . तेच समर्थ मना सर्वथा सत्य सांडू नको रे असे पाचव्या श्लोकात लिहितात

4) आर्जव आर्जवी स्वरात आणि गोड शब्दात बोलावे यावर समर्थांनी पुढे   – ‘सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी असे  ५३व्या  श्लोकात लिहिले आहे

5) सदा सर्वदा सत्यवादी विवेकी सत्यवादी आणि विवेकाने वागणे म्हणजे सदाचार असे समर्थ पुढे ५३ व्या श्लोकात

6) मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी  असे समर्थ ५१ व्या श्लोकात लिहितात कारण द्वेष आणि मत्सर मनात असेल तर मनुष्य कोणत्याही थराला जातो आणि त्याच्या हातून नको ते कोणतेही कृत्य घडू शकते 

असे बरेच उपदेश दासबोधात सुद्धा समर्थानी वेळोवेळी केले आहेत. असे वागल्याने माणसाचे आयुष्य धन्य होते.  मनुष्य जन्माचा मूळ उद्देश भगवंताची ओळख आहे आणि तो उद्देश साधला की मनुष्य जन्म धन्य झाला आणि सार्थकी लागला. ऐहिक गोष्टी मिळवून जो मनुष्य खूप यशस्वी झाला  त्याचे आयुष्य सार्थकी लागले आणि तो धन्य झाला असा सर्व सामान्य समज आहे तो इथे समर्थांना अभिप्रेत नाही .

|| जय जय रघुवीर समर्थ ||

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मना मानसीं दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी