पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा
इमेज
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले ।  तया देवरायासी कोण्ही न बोले ॥ जगीं थोरला देव तो चोरालासे ।  गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ॥ १७९ ॥ समर्थांनी अतिशय कठोर शब्दात आणि एकदम रोखठोकपणे आपल्याला खूप महत्वाचा संदेश या श्लोकातून दिला आहे आणि जागे करायचा प्रयत्न केला आहे. या आधी श्लोकात समर्थ मनाला सज्जन असे म्हणत त्याला आंजारून गोंजारून समजावून सांगायचे. या श्लोकात मात्र त्यांनी एकदम आपला भक्तीचा मूळ उद्देश काय असतो हे सांगून टाकले आहे. या श्लोकापासून पुढे चार श्लोकांमध्ये समर्थ या भगवंत किंवा परमेश्वर किंवा थोरला देवाविषयीचे ज्ञान केवळ सद्गुरूच्या कृपेनेच मिळेल आणि तो सद्गुरू कसा ओळखायचा याबद्दल सांगत आहेत. यापूर्वीही बऱ्याच श्लोकांत त्यांनी संत सज्जन किंवा सद्गुरू आणि त्यांचे मार्गदर्शन याबद्दल सांगितले आहे. इथे ते म्हणतात देव -देवता देवता सगळ्याना सगळ्यांना आवडतात आणि त्यांची सगळे पूजा करतात पण खरा असलेला थोरला देव, देवराया हा या त्रैलोक्याचा निर्माणकर्ता आहे त्याला कोणी ओळखायचा फंदात पडत नाही हें सर्व आजूबाजूला दिसणारे, भासणारे विश्व ज्याच्यामुळें उत्पन्न होतें, ज्याच्या मुळे सगळे व्...
इमेज
  नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।  नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा ।  प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ आपण शाश्वत समाधान आणि सुख मिळवण्याची आपले "धड" पडे पर्यंत धडपडत असतो . त्यासाठी कष्ट करून प्रापंच उभा करतो, धार्मिक कृत्य करतो आणि तरी सुद्धा प्रापंचिक सुखं भोगताना आणि भोगून संपल्यावर आनंद आणि समाधान मिळत नाही असा राख ठोक प्रश्न विचारून आत्मपरीक्षण करायला लावणारा हा श्लोक आहे १) कर्म : कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन! मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽ स्त्वकर्मणि॥२.४७॥ फळाची आशा धरून कर्म करू नका, असे गीते मध्ये भगवंताने सांगितले आहे. त्यासाठी आपण फळाची आसक्ती न धरता, पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करून ज्यावर आपला अधिकार चालतो ते कर्म जास्तीत जास्त सुंदर, योग्य, विवेकपूर्ण करावे. पण आपण नेमके उलट करतो आणि प्रत्येक कर्म करतांना फळाची अपेक्षा ठेवतो आणि त्यातून जय-पराजय, सुख-दु:ख, लाभ- हानी अशा कुठल्याही परिणामाने दुखी होतो. सुख मिळाले तर माझ्या कर्तृत्त्वामुळे आणि दुःख मिळाले तर देवामुळे अशी समजूत करून घेतल्याने कर्म करून सुद्धा आपल्याला दुः...
इमेज
  नको रे मना वाद हा खेदकारी।  नको रे मना भेद नानाविकारी॥ नको रे मना शीकवूं पूढिलांसी।  अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ अहंकारामुळे आपल्या आयुष्यात किती नुकसान होऊ शकते याचे आधी पण अनेक श्लोक येऊन गेले आहेत. पारमार्थिक प्रगतीमध्ये अहंकार हा मुख्य शत्रू आहेच. त्याला उपाय प्रत्येक गोष्टीच्या मागे "राम कर्ता " भावना ठेवणे किंवा शरणागती पत्करणे. तसे केल्या शिवाय आत्मज्ञान होणार नाही. पण प्रपंचात सुद्धा अहंकाराने आपले नुकसान होते. कसे ते या श्लोकात त्यांनी अतिशय साध्या शब्दात सांगितले आहे. अहंकारामुळे वादविवाद वाढत जातात आणि त्यातून खेद वाढत जातो. आपल्या मनात इतरांच्या विषयी भेद निर्माण होतात आणि त्यामुळे द्वेष मत्सर वाढून त्यातून मनस्ताप वाढत जातो. शेवटी शारीरिक विकार सुरु होतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्याला शिकवायला जातो आणि त्याने ऐकले नाही परत आपल्याला दुःख होते. हे तीन दुष्परिणाम एकट्या अहंकारामुळे होतात. अहंकार, EGO, ह्याचा मुळ अर्थ, मी किंवा माझे, मीपणा असा होतो. अर्थातच तुम्ही कोण आहात ? ह्याचं तुम्ही स्वतःला दिलेलं उत्तर म्हणजे अहंकार. आपण स्वत:बद्दलची केलेली संज्ञा(...
इमेज
  बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।  परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥ मना सार साचार ते वेगळे रे।  समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥ अमेरिकेची यात्रा म्हणजे विवेकानंदांचे एक विलक्षण साहसच होते.. अमेरिकेत कुठेतरी, केव्हातरी एक सर्वधर्मपरिषद होणार आहे, एवढंच त्यांनी अस्पष्टपणे ऐकलेलं होतं. या परिषदेबद्दलची निश्चित आणि तपशीलवार माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी, त्यांचे शिष्य, भारतीय मित्र, विद्यार्थी, पंडित, मंत्री किंवा महाराजांनी कुणीही केली नव्हता. तरीही हा तरुण स्वामी त्या परिषदेस जाण्यास निघाला होता. सर्वधर्म परिषद सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असून प्रतिनिधी म्हणून नाव नोंदणीची तारीख निघून गेल्याचं त्यांना कळालं. मान्यताप्राप्त धार्मिक संस्थेचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रतिनिधी म्हणून कोणाचंही नाव स्वीकारलं जाणार नसल्याचंही माहीत झालं. आकर्षक देहयष्टीमुळं विवेकानंद कुठंही जात असले, तरी लोकांच्या नजरेतून सुटत नसत. बोस्टनच्या गाडीतच मॅसेच्युसेट्स इथल्या एका श्रीमंत महिलेशी त्यांचा संवाद सुरू होता. महिलेनं विवेकानंदांना आपल्या घरी राहण्यास बोलावलं. इथंच विवेकानंदांची हार्वर्ड विद्यापीठातील ...
इमेज
फुटेना तुटेना चळेना ढळेना ।  सदा संचलें मीपणें तें कळेना ॥ तया येकरूपासि दूजें न साहे ।  मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४७ ॥ पूज्य तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून गोंदवलेकर महाराज अनेक वर्षे बोलायचे हे आपल्यापैकी काही जणांना माहिती असेलच. तात्यासाहेब पेटीवर बसले की महाराज बोलतात यावर काही भक्तांचा आधी विश्वास बसला नाही. नंतर हळू हळू जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे वाणी रूप महाराज नक्की तेच आहेत हा संशय मनातून गेला. तो संशय कसा गेला त्याचा हा प्रसंग पुढे देत आहे . वाणी रूपातील महाराज जेव्हा सकाळी प्रवचन करीत. त्यांची भाषा  अत्यंत मृदू आणि मधाळ होती. सोप्या शब्दात ते वेदांत समजावून सांगत . तेथे जमलेले काही निवडक भक्त अगदी मंत्र मुग्ध होत. त्यातील काही भक्त पूज्य तात्यासाहेब केतकर (वाणी रूपातील महाराज) यांना घरी आमंत्रण करीत. ज्या प्रमाणे वेळ असेल त्याप्रमाणे तात्यासाहेब भक्त मंडळींच्या घरी जात आणि तिकडे प्रवचन आणि प्रसाद याचा कार्यक्रम होत असे. असेच एकदा  त्यांचे प्रवचन झाल्यावर घरातील मंडळी नमस्कार करायला आली. महाराज त्या सगळ्यांशी अत्यंत ...
इमेज
    अविद्यागुणे मानवा ऊमजेना ।  भ्रमें चूकलें हीत तें आकळेना ॥ परीक्षेविणें बांधलें दृढ नाणें ।  परी सत्य मिथ्या असें कोण जाणें ॥ १४३ ॥ या श्लोकाचे दोन अर्थ बघूया. पहिला अर्थ आपण समर्थांना अभिप्रेत आहे तो बघूया -जे दिसलें तेंच सत्य मानावें हें काही ज्ञानी माणसाचे पाहणें नव्हे. जड, मूढ व अज्ञानी जीव त्यास सत्य मानतात. केवळ इंद्रियांना दिसते म्हणून तेच खरे मानू लागलो याला अविद्या म्हणतात . एका माणसाला स्वप्न पडले आणि स्वप्नात त्याला पुष्कळ द्रव्य सांपडले. पुष्कळ लोकांशी त्याने व्यवहार केला. पण त्याचे स्वप्न होते हे त्याला नंतर समजले पण झोपेत असतांना तो ते द्रव्य उपभोगत होता. मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल ? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे आजमावता येणार ? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हां त्याच्या इच्छेनेच...
इमेज
जगीं पाहतां साच तें काय आहे ।  अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥ पुढें पाहतां पाहतां देव जोडे ।  भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ या जगात सत्य म्हणून काही आहे का, हा प्रश्न मनात येतो तेव्हा समर्थ सांगतात की अतिशय आदरानं हा प्रश्न मनात जपून ठेव. त्याची हेळसांड करू नकोस. तो प्रश्न विस्मरणात जाऊ देऊ नकोस. कारण मनात प्रश्न उद्भवला तरी तो मनानंच झिडकारला जाण्याची शक्यता असते.  जीवनात नेमकं सत्य आहे तरी काय, हा प्रश्न मनात आला तरी मनच सांगतं, सत्य काय ते आपल्याला कधी कळेल तरी का? आपली का ती कुवत आहे? तेव्हा समर्थ सांगतात, या प्रश्नाचा अत्यंत आदरानं स्वीकार करा आणि अत्यंत आदरानं उत्तराचाही शोध घ्या! कारण जोवर ‘कोऽहं’ म्हणजे ‘मी खरा कोण आहे,’ हा प्रश्न मन कुरतडत नाही, तोवर ‘सोऽहं’म्हणजे ‘मी तोच आहे,’ इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं पहिलं पाऊलही उचललं जात नाही. आपल्याला डोळे मिळाले आहेत. त्यांच्या मदतीने आपण आजूबाजूला असलेल्या गोष्टी पाहतो. कान मिळालेले आहेत, त्यांनी ऐकतो. कधी असं होतं की एखाद्या गोष्टीबद्दल आपण ऐकून असतो त्यापेक्षा ती प्रत्यक्ष बघितल्यानंतर वेगळीच निघते. आणि कधी अ...
इमेज
    । भजावा जनीं पाहता राम एकू ।  करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू ।  धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥   "जय जय राम कृष्ण हरी " हा वारकरी भक्तांचा मंत्र सगळ्यांना माहिती आहेच. पण त्यात जो देवाचा क्रम आहे त्याला खूप महत्व आहे. रामचे चरित्र सर्व सामान्य लोकांना अनुकरणीय आहे म्हणून त्याचे नाव पहिल्यांदा घेतले आहे . रामाचा आचार , कृष्णाचा विचार आणि त्याच बरोबर विठ्ठल नामाचा उच्चार करावा म्हणून हा मंत्र आहे.   त्याच मंत्रातील प्रभू राम चंद्राच्या सद्गुणांचे वर्णन समर्थ या १३१ क्रमांक च्या श्लोकात करत आहेत.   भक्ताच्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो किंबहुना असायला हवा तो म्हणजे चरित्र अभ्यासाचा. आणि केवळ भक्तीमार्ग नव्हे तर कुठल्याही विषयाशी निगडीत कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण आदर्श म्हणून स्वीकारतो , तेव्हा त्यांचा चरित्र्य अभ्यास ही त्या साधकाच्या दृष्टीने असणारी फार महत्त्वाची गोष्ट असते ...आपण ज्या व्यक्तीचं अनुकरण करत असतो ...ती व्यक्ती प्रत्येक वेळी सहवासाच्या रूपानेच आपल्याला मिळते असं नाही ...तर तिच...