पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा
इमेज
 उभा कल्पवृक्षातळू दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥ जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागता शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥ आपण सगळ्यांनी अर्ध्या भरलेल्या पेल्याचे उदाहरण तर किमान दोनशे वेळेला तरी ऐकले असेल.  पेला अर्धा भरलेला आहे असे म्हणणारे आशावादी आणि अर्थ पेला रिकामा आहे असे म्हणणारे निराशावादी. या पुढे जाऊन “वास्तववादी” मोदी म्हणतात अर्थ पेला भरलेला आहे आणि बाकीच्या अर्थ भागात हवा भरली आहे. समर्थ आपल्याला वर्तमानवादी असावे असे शिकवतात.  जें जें मनांत येईल ते तें जो पुरवितो त्या वृक्षाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्याच्यातळी उभा राहून जर कुणी दुःखाची कल्पना करील तर त्याला सतत दुःखच भोगावे लागेल. ‘अमुक मिळावं,’ ही जिवाच्या मनात उत्पन्न होणारी इच्छा भ्रामक आणि निराशावादी सुद्धा असू शकते. मग ती इच्छा योग्य आहे की अयोग्य, आपल्या हिताची आहे की अहिताची, याचा कोणताही विचार ती इच्छा पूर्ण करताना कल्पतरू करीत नसतो. कल्पवृक्ष हे काल्पनिक असले तरी मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तरी सुद्धा आपल्या माहिती आहे आपण ज्या वातावरणात वाढतो, त्या वातावरणाचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्...
इमेज
 मना प्रार्थना तूजला एक आहे ।  रघूराज थक्कीत होऊनि पाहे ॥  अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥  या आधीच्या दहा श्लोकांमध्ये राम आपल्या भक्तांची कशी काळजी करतात, रामचंद्र किती पराक्रमी आहेत आणि आपली सदैव काळजी घेतात हे सुद्धा पटवून दिले. शाश्वत सुख पाहिजे असेल तर रामभक्ती आणि नामस्मरण याला पर्याय नाही हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून आता समर्थ त्यासाठी उपाय सांगत आहेत . समर्थ भक्तीचे प्रॉडक्ट मार्केटिंग करत असल्यासारखे आपल्याला प्रार्थना करत आहेत की रघुराजाची (भगवंताची) लीला बघून तू थक्कं होऊन जाशील. कारण भगवंताने तयार केलेली प्रत्येक वस्तू कशी नीटनेटकी असते, पाऊस कसा जुलै महिन्यात येतोच येतो, फळं, फुलं, पानं यांचे किती विविध प्रकार असतात असा दृष्टीकोन ठेवून जगाकडे बघितले तर तू थक्क होशील. लहानपणी माझी आजी मला डाळिंबं  सोलून देतांना म्हणायची "आहे का तुमच्याकडे असं पॅकिंग? माझा राम बघ कसं एकदम उत्तम पॅकिंग करून डाळिंबाचे दाणे पाठवतो आहे, इतक्या लाखो डाळिंबं असतात एकदा तरी चुकीचे पॅकिंग केलेलं डाळिंबं निघालय का ? जे डाळिंबं खराब होते ते माण...
इमेज
  सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।  उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।   नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥ मी कोण आहे याचे उत्तर आपल्याला कळात नाही जो पर्यंत आपल्याला भगवंताची भेट होत नाही . सध्या आपल्याला मी म्हणजे देह अशीच ओळख आहे . मी म्हणजे देह असे वाटते त्याला देहबुद्धी म्हणतात . पण खरा मी देह नसून मी आत्मा आहे हे समजणे म्हणजे आत्मज्ञान होणे , म्हणजेच माझी आणि परमात्म्याची भेट होणे . म्हणजे जिवाची आणि शिवाजी भेट होणे . प्रत्येकाच्या आत   मध्ये भगवंताचा अंश आहे आणि त्याला   ईश्वराची भेटायची ओढ लागली आहे आणि त्यातच शाश्वत सुख आहे हे आपल्याला माहित आहे . पण प्रपंच्या च्या रहाट गाडग्यात आपल्याला त्याचा विसर पडला आहे . आपण शाश्वत सुखाच्या मागे लागतो म्हणून प्रत्येक वेळेस आपण विचार करतो की ही सुखी परिस्थिती , आता मिळणारा आनंद , हे बांधलेलं घर , ही नवीन गाडी , ही नवीन वस्तू , हे सुख किती टिकेल असा प्रश्न आपल्या...