पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुक्रमणिका

|| भये व्यापिले सर्व ब्रह्मांड ...भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास ....वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ गणाधीश जो ईश सर्वा ....गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ जगीं पाहतां साच तें काय ...भ्रमे भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ जनी सांगतां ऐकतां जन्म ..... तुटे वाद संवाद तो हितकारी ॥ ११२ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे .....तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ जनीं सर्वसूखी असा कोण ....त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म....कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ जेणें मक्षिका भक्षिली ...तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना।। १५९।। तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले....गुरूवीण तो सर्वथा ही न दीसे ||१७९ ||
धुरू लेकरूं बापुडे ....नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ न ये राम वाणी तया थोर ...बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको रे मना वाद हा ....अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥ नव्हे कर्म ना धर्म ना.......प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत ..जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय ...विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ बहू शास्त्र धुंडाळितां वाड ...गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ बहू हिंपुटी होईजे ....अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा.....समस्तांमधे एक ते आगळे रे || १५२ }} भजावा जनीं पाहता राम एकू .....धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे......परी संग सोडुनि सुखी रहावे॥१८७॥ मना पापसंकल्प सोडूनि ....विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ मना पाविजे सर्वही सूख .....मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० || मना मानसीं दुःख ... विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ मना वासना दुष्ट कामा .. मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना वासना वासुदेवीं.....मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे......मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची ....जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥. मुखी राम त्या काम बाधू शकेना.......जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे....नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ shlok 001 to 010
अधिक दर्शवा
इमेज
बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे ।  जया निश्चयो येक तो ही न साहे ॥ मती भांडती शास्त्रबोधें विरोधें ।  गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥ अध्यात्म शास्त्रात अनेक पुस्तके आहेत आणि भागवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत . प्रत्येक पुस्तक वाचून त्यातील अर्थ समजून घेणे शक्य नाही आणि त्यामुळे अजून गोंधळ निर्माण होणेच होण्याचा संभव जास्त . आपण  किती वाचावे, आणि त्याचा अहंकार  मिरवावा का या बद्दल समर्थानी इथे भाष्य केले आहे . ग्रंथ अनंत आहेत आणि  रोज एक ग्रंथ वाचून संपवतो म्हटलें तरी माणसाचे आयुष्य पुरणार नाहीं.  जेवढें होईल तेवढे वाचले म्हटलें तरी त्यातून पदरांत हे महत्वाचे.   परमेश्वर आणि मोक्ष प्राप्तीचे विविध मार्ग आहेत. कर्म, शरीर, जन्ममरण, दुःख, पाप इ. अनिष्ट बंधनातून मुक्त झाल्यामुळे जीवाला प्राप्त होणारी पारमार्थिक कल्याणाची सर्वोत्तम अवस्था म्हणजे मोक्ष. जगातील विविध धर्म व संप्रदाय आपल्या अनुयायांना मोक्ष देण्याचे आश्वासन देत असतात आणि त्यासाठी आपण उपदेशिलेल्या मार्गाचा लोकांनी अवलंब करावा, असा त्यांचा आग्रह असतो. भगवद्‌गीतेत  चार धार्मिक संप्र...
इमेज
  अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।  तया पामरा बाधिजे सर्व काही ॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।   वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ शाळे मध्ये परीक्षेत दोन भिन्न गोष्टी मधील फरक सांगा असा एक नेहेमी प्रश्न असायचा. या श्लोकात समर्थ बद्ध आणि साधक या दोन   भिन्न प्रवृत्तीच्या लोकांमधील फरक सांगत आहेत. पहिल्या दोन ओवी बद्ध प्रवृत्तीच्या आहेत आणि तिसरी आणि चौथी साधक प्रवृत्तीबद्दल सांगत आहेत. कसे ते बघू. दारूच्या आहारी गेलेल्या एखादा मनुष्य व्यसन मुक्ती केंद्रात गेल्यावर तिकडे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर रुग्णांना दारू पासून होणारे दुष्परिणाम सांगतात. वेगवेगळ्या तऱ्हेने समजावून सांगतात आणि त्यांना त्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतात. तरी सुद्धा काही रुग्ण ऐकत नाहीत कारण त्यांना आपले हित कशात आहे हेच समजून घ्यायचे नसते. त्याच प्रमाणे संसारात ज्याला आपले नरजन्माचे हित समजत नाही त्या लोकांना उद्देशून हा श्लोक लिहिला आहे. अशा लोकांना समर्थ इथे पामर असे म्हणतात. पामर म्हणजे ज्याची कीव करावी असा. माझ्या मते माणसाला दिलेली ही सगळ्यांत वाईट शिवी आहे. पुरुषाला न...
इमेज
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।  भ यातीत ते संत आनंत पाहे ॥ ज या पाहता द्वैत काही दिसेना । भयो मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥   विमानात ब्लॅकबॉक्स असतो आणि accident झाल्यावर शेवटच्या काही तासात नक्की काय झाले या साठी त्याचा उपयोग करतात . आपल्या शरीरात  असा एक ब्लॅकबॉक्स म्हणजेच मन . कोणाच्याही मनात कोणत्याही वेळी डोकावून बघीतले तर त्यात एकच दिसेल ते म्हणजे भय . कशाचे भय ?  विषयांच्या अतिसेवनाच्या (LIFESTYLE )   मुळे भयंकर रोग होण्याची भीती , संपत्ती असल्यास आयकर खात्याचे भय , कुलवंतांना कुळाची अब्रू जाण्याच भय , सन्मान मिळाला तर तो कसा टिकवावा याचे भय . राजकारणी आणि बलवानाला आपल्यापेक्षा अधिक बलशाली शत्रूचे भय , सौंदर्यवतीला वार्धक्याचे , पंडिताला दुसऱ्या पंडिताशी वादात हरण्याचे , गुणवंताला एखाद्या वेळी पाय घसरण्याची भीती , तर शरीराला मृत्यूचे भय . काय काय सांगू ? थोडक्यात सर्वच गोष्टी भयकारक आहेत . केवळ वैराग्य असलेलाच निर्भय असू शकतो असे समर्थ म्हण...